( स्पर्धा परीक्षा इ. पाचवी व आठवी साठी मराठीमध्ये म्हणी असतात. चार-पाच वर्षापूर्वी म्हणी प्रचलित असणाऱ्या सहज सोप्या ऐकलेल्या, वाचलेल्या अशा असायच्या परंतु हल्ली सराव किंवा मुख्य परीक्षेला येणाऱ्या म्हणी विद्यार्थ्यांच्या वयोगट, आकलन, आशयापलिकडील आहेत असे माझे वैयक्तिक मत आहे. म्हणून प्रचलित म्हणी शिवाय काही म्हणी विद्यार्थ्यांसाठी देण्याचा हा अल्पसा प्रयत्न.)
* अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
* अती झाले गावचे अन् पोट फुगले देवाचे.
* अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज.
* अंधारात केले, पण उजेडात आले.
* अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
* अती झाले गावचे अन् पोट फुगले देवाचे.
*आईची माया अन् पोर जाईल वाया.
*अडली गाय फटके खाय.
*अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का?
*अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप.
*अति खाणे मसणात जाणे.
*अठरा नखी खेटरे राखी, वीस नखी घर राखी.
*अवचित पडे, नि दंडवत घडे.


